
राहाता : गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात सिंचन व पिण्यासाठी दारणा व गंगापूर सामूहिक धरण प्रकल्पामधून 12 एप्रिलपासून आवर्तन सोडण्यात येणार आहे. गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यातून हे आवर्तन 15 एप्रिलपासून सुरू होईल. हे आवर्तन 22 दिवस चालेल, अशी माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिली.
विखे पाटील म्हणाले, ""राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. यामुळे राज्यात लॉकडाउन आहे. त्या अनुषंगाने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 मधील जमावबंदी आदेशाचे पालन लाभक्षेत्रातील सर्व लाभधारकांनी करून जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवर्तन सुरळीत होण्यासाठी सहकार्य करावे.
हेही वाचा - कोरोनाचा कोपरगावकडे मोर्चा, महिलेला झाली बाधा
हे आवर्तन लाभक्षेत्रातील अधिकृत लाभधारकांना फळबाग, बारमाही पिके, हंगामी पिकांसाठी असल्याने पाण्याचा शेतकऱ्यांनी जपून वापर करावा. धरणातील पाण्याची उपलब्धता आणि वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन आवर्तन सुरळीत पूर्ण करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.''
दरम्यान, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. शिंदे यांनी आज आवर्तनाबाबतचे प्रकटन जाहीर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.