पुरोगामी विचारांचे हत्यारे  पश्‍चिम महाराष्ट्रातूनच कसे?

2mallikarjun_kharge_3
2mallikarjun_kharge_3

सांगली ः महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांना पश्‍चिम महाराष्ट्राने बळ दिले. महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते अलिकडे डॉ. पतंगराव कदम यांच्यापर्यंत साऱ्यांनी शिक्षणाचा प्रचार, प्रचार केला. पुरोगामी विचारांना साथ दिली. याच भागात पुरोगामी विचारांची हत्या करणारे लोक कसे वाढताहेत? सनातनी विचार येथे कसे रुजताहेत, अशी खंत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी आज येथे व्यक्त केली. 

मिरज येथे गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या रौप्य महोत्सव सांगता समारंभाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री जयंत पाटील, विश्‍वजीत कदम आदी उपस्थित होते.

श्री. खर्गे म्हणाले, ""महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. इथे आधुनिक शिक्षणाची बिजे रुजली आहे. डॉ. आंबेडकरांनी सांगितले, विचार करा आणि मग आचरण करा. शिक्षण प्रसारातही हा भाग पुढे आहे, मात्र दुर्दैवाने सनातनी विचारांची येथे वाढ होते आहे. गौरी लंकेश, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांचे हत्यारे या भागातून येतात, हे कशाचे लक्षण आहे. याचा विचार झाला पाहिजे.''  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com