'ईश्वरपूर नामांतराची १७२ वर्षांची मागणी आम्ही पूर्ण करून नागरिकांच्या भावनांचा आदर केला'; प्रचारसभेत काय म्हणाले CM फडणवीस?

Fadnavis Confirms Fulfilment of 172-Year Ishwarpur Renaming Demand : इस्लामपूर नामांतराची १७२ वर्षांची मागणी पूर्ण केल्याचे फडणवीसांनी सांगितले. भुयारी गटर व २४x७ पाणी योजना मंजूर केली असून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

esakal

Updated on

ईश्वरपूर : ईश्वरपूर शहरवासीयांची ईश्वरपूर नामांतराची १७२ वर्षांची मागणी आम्ही पूर्ण करून शहरातील नागरिकांच्या भावनांचा आदर केला आहे. आता उरुण-ईश्वरपूरही केले आहे. शहरासाठी भुयारी गटर योजना, २४ बाय ७ पाणी योजनेच्या कामाला मंजुरी दिली आहे. निवडणुकीनंतर ही कामे करून शहर राज्यात आदर्श करण्यासाठी प्रयत्न करू, तुम्ही जे मागितले ते दिले. आता आमची मागायची वेळ आहे, त्यामुळे महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे व नगरसेवकपदाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com