सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत लोकांनी ज्यांनी निवडून दिले आहे. त्यांची त्यांनी टर्म पूर्ण करावी, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर व्यक्त केले. महापालिकेत येण्यासाठी मला निमंत्रण मिळाले आहे. वेळ मिळताच मी जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे पदवीधर व शिक्षक विधानपरिषद निवडणुक प्रचार काळात मंत्री पाटील यांच्या संपर्कात राष्ट्रवादीचे नगरसेवक आल्याची चर्चा सुरु होती. त्यावरुन सत्तांतराच्याही चर्चा सुरु झाली होती. याबाबत पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, सांगली महापालिकेत लोकांनी ज्यांना (भाजप) निवडून दिलेले आहे. त्यांनी त्यांची टर्म त्याच ठिकाणी पूर्ण करावी. महापालिकेत पक्षांतराचा विषयच येणार नाही. यासाठी मला कोणीही भेटलेले नाही. महापालिकेचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री म्हणून मला भेटीचे निमंत्रण मिळालेले आहे. सध्या मी दौऱ्यांत व्यस्त आहे. वेळ मिळताच मी महापालिकेत जाणार आहे.'
हेही वाचा - मुख्यमंत्री आले कधी, गेले कधी समजलेच नाही -
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुक प्रचार काळात मंत्री पाटील यांच्या संपर्कात भाजपाचा एक गट लागल्याची जोरदार चर्चा होती. भाजपचे सात नगरसेवक मंत्री पाटील यांच्या संपर्कात असून येत्या फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या महापौर निवडीवेळी सत्तातरांची चर्चा जोरदार सुरु झालेली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री पाटील यांनी लोकांनी निवडून दिल्यामुळे ज्यांची त्यांनी टर्म पूर्ण करावी, असे म्हटले आहे. यामुळे मंत्री पाटील स्वतः पक्षांतरासाठी प्रयत्न करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकीय पक्षांत सत्तातराची चर्चा सुरुच राहणार आहे.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.