Kolhapur: साडेसोळा हजार सातबारे होणार ‘जिवंत’; मयतांच्या वारसांची नावे लागणार, महिनाअखेर होणार मोहीम पूर्ण

जमिनीच्या मालकी हक्कांची माहिती अधिकृत आणि अद्ययावत होणार आहे. सरकारच्या १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत ही मोहीम राबविण्यात येत आहे. यात तलाठ्यांकडून गावनिहाय सर्व्हे करण्यात येत आहे.
Massive land record update: Heirs’ names to be added to 16,500 Satbara entries by month-end.
Massive land record update: Heirs’ names to be added to 16,500 Satbara entries by month-end.Sakal
Updated on

प्रवीण देसाई

कोल्हापूर : जिल्ह्यातील साडेसोळा हजार सातबारा उताऱ्यांवर मृत खातेदारांची नावे कायम आहेत. त्यामुळे वारसांना अनेक अडचणी येत आहेत.

त्या दूर करण्यासाठी 'जिवंत सातबारा' मोहिमेंतर्गत तलाठ्यांद्वारे गावनिहाय सर्व्हे सुरू आहे. फेरफार प्रक्रिया होऊन सात-बारा उताऱ्यांवर मृत खातेदारांच्या जागी वारसांची नावे लावण्याचे काम सुरू आहे. या महिनाअखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जवळपास तीन हजार वारसांची नावे सातबाऱ्यावर लागली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com