"पत्रकार गौरी लंकेश व डॉ. दाभोलकर यांच्या खून खटल्यामध्ये शिक्षा झालेल्या आरोपींना देखील पानसरेंच्या खटल्यामध्ये जामीन मिळाला आहे. ही गोष्ट निषेधार्ह आहे."
कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या हत्येतील संशयित आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. यामुळे राज्यातील पुरोगामी चळवळीमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, संशयितांचा जामीन रद्द करावा, तसेच पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व तपास अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी ‘आम्ही भारतीय लोक आंदोलन’तर्फे (Aamhi Bhartiya Lok Andolan) निवेदनाद्वारे करण्यात आली.