घटनास्थळी मिळून आलेल्या वरदच्या मृतदेहावर कुंकू, गुलाल टाकण्यात आले होते. तेथे लिंबूही मिळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याची चर्चा होती.
कोल्हापूर : मामाच्या गावी वास्तुशांतीसाठी गेलेल्या वरद रवींद्र पाटील (वय ७) याचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी आरोपी दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य (वय ४६, रा. सोनाळी, कागल) याला न्यायालयाने (Kolhapur Court) मंगळवारी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. अपहरण, खून व पुरावे नष्ट करणे आदी कलमांतर्गत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी त्याला दोषी ठरवले. ऑगस्ट २०२१ मध्ये हा प्रकार उघडकीस आला होता.