

Ajit Pawar Politics : ‘रक्षाबंधन झाले आता भाऊबीज होईल. भावाच्या नात्यात आम्ही कधीही अंतर पडू देणार नाही. लाडक्या बहिणींसाठी प्रत्येक वर्षी ४५ हजार कोटी रुपये तरतूद करून ठेवले आहेत. राज्यातील तीन, पाच, साडेसात हॉर्सपॉवर वीज पंपाची वीज माफ करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांची २० हजार कोटी रुपयांची बिले सरकारकडून भरली जात आहेत.’ कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केले.