आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याबाबत मंगळवारी तोडगा?

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याबाबत मंगळवारी तोडगा?

गडहिंग्लज (कोल्हापूर) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याचा (गोडसाखर) गळीत हंगाम स्वबळावर सुरु करण्यासाठी येणार्‍या विविध अडचणीसंदर्भात कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे व उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी आज माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याशी मुंबईत चर्चा केली. या चर्चेअंती मंगळवारी (ता. 28) मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक घेवू असे सांगून पवार यांनी केडीसीचे अध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाही बैठकीसाठी बोलावल्याची माहिती उपाध्यक्ष नलवडे यांनी ’सकाळ’ला सांगितले. दरम्यान, या बैठकीत सकारात्मक तोडगा निघण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

दोन दिवसापूर्वी नलवडे यांनी मांजरी (पुणे) येथे पवारांची भेट घेवून गोडसाखरच्या प्रश्‍नावर चर्चा केली होती. या प्रश्‍नाचे गांभीर्य ओळखून पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये नलवडे व अ‍ॅड. शिंदे यांच्याशी आज तातडीने चर्चा करुन अडचणी समजावून घेतल्या. दोन्ही पदाधिकार्‍यांनी यंदाच्या गळीत हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर विविध अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. ब्रिस्क कंपनीने कारखाना सोडला असून तो संचालक मंडळाच्या ताब्यात दिला आहे.

स्वबळावर कारखाना चालवण्याचे प्रयत्न संचालकांचे सुरु आहेत. गळीत हंगामासाठी कारखान्याला केडीसीकडून कर्ज मिळावे म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. बँकेला प्रस्ताव दिला. परंतु उणे नेटवर्थमुळे कर्ज मिळाले नाही. यानंतर पुर्नमूल्यांकनाद्वारे कारखाना प्लस नेटवर्थमध्ये आणून सुधारीत प्रस्ताव दिला, त्यावेळीही त्याला यश मिळाले नसल्याचे शिंदे व नलवडे यांनी सांगितले.

कारखान्याला किती कर्जाची गरज आहे, या पवार यांच्या प्रश्‍नावर नलवडे यांनी आधुनिकीकरण व देखभाल दुरुस्तीसाठी तातडीने 30 कोटीची गरज असून त्यातून 3500 मे. टनाने गाळप, स्पिरीट निर्मिती, रिकव्हरी वाढवता येईल. त्याद्वारे कारखाना फायद्यात येवू शकतो असा विश्‍वास देवून केडीसी बँकेने कर्ज दिल्यास हा प्रश्‍न निकाली निघेल अशी अपेक्षाही शिंदे व नलवडेंनी व्यक्त केली. त्यानंतर लगेचच पवार यांनी मंगळवारची बैठक निश्‍चित केल्याचे सांगण्यात आले.

जुन्या आठवणींना उजाळा

. पवार यांनी, संस्थापक कै. आप्पासाहेब नलवडे यांनी कारखाना उभारणीसाठी घेतलेले कष्ट, कमी खर्चात उभारलेला कारखाना, कारखान्याच्या शुभारंभवेळी असलेली स्वत:ची उपस्थिती, हा कारखाना शेतकर्‍यांच्या मालकीचा राहिला पाहिजे यासाठी कै. नलवडेंचा असलेला आग्रह आदी मुद्यांना अनुषंगून जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचेही नलवडे यांनी सांगितले.आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याचा मंगळवारी तोडगा?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com