Kolhapur Farmers : तंबाखूपासून कांद्याकडे वळले आणि नशीब पालटले; बहिरेवाडीचा कांदा बंगळूर बाजारपेठेत

Bengaluru Market : बहिरेवाडी (ता. आजरा) येथील शेतकऱ्यांनी घेतलेल्या एका निर्णयाने गावाचे अर्थकारणच बदलले आहे. तंबाखू पिकाच्या नुकसानीनंतर पर्यायी रब्बी पीक म्हणून घेतलेला कांदा आज थेट बंगळूर बाजारपेठेत पोहोचला आहे.
onion are in bengaluru Market 

onion are in bengaluru Market 

sakal

Updated on

उत्तूर : जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या कांदा पिकाकडे बहिरेवाडी (ता. आजरा) येथील शेतकरी वळले आणि त्यांचे अर्थकारणच बदलून गेले आहे. येथील शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा बंगळूरच्या बाजारात तेथील व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी ठेवला आहे. मोठा कांदा असल्याने विशेषतः हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी वाढत आहे. यावर्षी ७० शेतकऱ्यांनी कांदा पिकवला आहे. त्यांना सरासरी एकरी १० टन उत्पादन मिळाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com