
कोल्हापूर : दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची आता खैर नाही. कारण शहर वाहतूक नियंत्रण शाखेने आता पुन्हा मद्यपी वाहनचालकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकही स्थापन केले आहे.
कोरोनामुळे लॉकडाउन लागू केले. रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी असल्याने अपघाताचे प्रमाणही कमी होते, पण टप्प्याटप्प्याने लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढली. अपघाताचे प्रमाणही वाढू लागले. सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येकाने अनिवार्य आहे. त्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून प्रबोधनासह कारवाईची धडक मोहीम सुरू आहे. लॉकडाउन काळात बारही बंद होते. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांचेही प्रमाण कमी होते, पण सोमवारपासून (ता.5) बार सुरू होत आहे.
मद्यपी वाहनचालकांमुळे अपघातांचे धोके वाढतात. अशा चालकांना आवर घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक केली आहे. या पथकाकडून चौकाचौकांत मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली जाईल. सायंकाळनंतर ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल. मद्यपी वाहनचालकांवर थेट गुन्हे दाखल होणार आहेत.
मद्यपी वाहनचालकांवरील कारवाई
जानेवारी ते ऑगस्ट 2020 अखेर
*एकूण कारवाई *दंडात्मक कारवाई *वसूल दंड *न्यायालयात दाखल खटले
*247 38 24,800 209
वर्ष कारवाई
*2018 301
*2019 444
मद्यपी वाहनचालकांवरील कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक केली आहे. त्या माध्यमातून शहरासह उपनगरातही ही कारवाई केली जाईल.
- वसंत बाबर, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.