बिवाळ्यातून हवे देशी बियाणांचे संवर्धन 

Conservation of indigenous seeds is required
Conservation of indigenous seeds is required

कोल्हापूर : : मे महिना संपत जाईल, तसे जमीन तयार झाली की, बी-बियाणांची चाचपणी सुरु होते. बियाणे नेमकं कुठे ठेवले आहे? 
ते सुरक्षित आहे का? ते किडलेले तर नाही ना, हे पाहिले जाते. अमुक एक बियाणे नसेल तर दुसऱ्याकडून ते बियाणे घ्यायचे. त्याबदली आपल्याकडील बियाणे दुसऱ्यांना द्यायचे हा ग्रामीण ट्रेंड अजूनही सुरु आहे; मात्र बि-बियाणे साठवण्याची पद्धती (बिवाळा) आता कालबाह्य झाली आहे. एकतर बियाणे बाजारातून विकत आणली जातात. पूर्वी घरात, खोपीत बियाणे जपून ठेवण्याची परंपरा लोप पावत चालली आहे.

बिवाळ्यामुळे अनेक बीज संवर्धित होतात. विविध कंपन्यांनी आपली बियाणे, वाण विकसित केले आहे. ही विकसित बियाणे शेतकरी आज शेतात, परसदारात वाढवितात. यामुळे मुळ बियाणे लोप पावून या बियाणांची डीएनए रचना पुढील पिढीत संक्रमित होत नाही. कितीतरी पारंपरिक बियाणे लोप पावून ती जागा नवीन बियाणांनी घेतली आहे. काही ठिकाणी मूळ बियाणे संवर्धित ठेवण्याकडे कल दिसतो. जसे की, टोपलं, बुट्टी, तट्ट्या, मातीचा डेरा आदीमध्ये बियाणे ठेवले जाते. तत्पूर्वी, बियाणे राखेत मिसळली जातात. रसायने, पावडर वापरली जात नाही. बिवाळ्यात कसर किंवा किड लागत नाही. पेरणीवेळी ते बियाणे पेरले जाते. ग्रामीण भागात "बिवाळा' हा शब्द आजही ऐकयला मिळतो. बिवाळ्यात भात, नाचणा, गहू, मिरची, भोपळा, कारले, सावा, वरणा बीज सुरक्षित राहते. 

काही कंपन्यांची बियाणे मिळतात; पण ती अनेकदा बोगस निघतात. म्हणजे ते पेरले तरी उगवत नाही. यासाठी शेतकरी गावात ज्यांच्याकडे मुळ बियाणे आहेत, ती घेतात. त्याबदली आपल्याकडील बियाणे देतात. हा बिवाळा वेळू, नारळाचा काथ्या, वाळवलेला भोपळा, कागदाचा लगदा, रांजन, माठामध्ये ठेवला जातो. यासाठी बियाणे वाळवले जाते. जिथे पाणी पडणार नाही, आर्द्रता शोषली जाणार नाही, अशा सुरक्षित ठिकाणी बियाणे ठेवतात. काही शेतकरी बिवाळ्यांचे संवर्धन करतात. बियाणांबरोबर मसाल्यातील बीजे, काजू, आंब्याची बाठ, फळांच्या बियाही टिकवून ठेवल्या जातात. यातून मूळ बीज सुरक्षित राहते. 


हा ठेवा जपला पाहिजे 
जेव्हा बाजारात शेतीतील बीज मिळत नाही तेव्हा हा "बिवाळा' अनेकांना उपयोगात येतो. गावातील एकमेकांना बियाणे देण्याचा हा ट्रेंड शेती, पिके टिकून ठेवेल. बिवाळा म्हणजे, एकार्थाने बीज बॅंकच आहे. या बॅंकेत दरवर्षी बियाणे ठेवली पाहिजे, ही अट असते. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com