

Students receive degrees
sakal
कोल्हापूर : ‘विद्यार्जनातील सर्वोत्कृष्टता, कामातील हुशारी व नीतिमत्ता, कुटुंबवत्सल व्यक्ती व अास्तिकवादी होऊन लोकांची मने जिंकायला शिका. दुसऱ्याच्या हास्याचे कारण बना’, असा मंत्र बीएपीएस स्वामी नारायण संस्थेचे प्रेरणादायी वक्ते डॉ. ज्ञानवत्सल स्वामी यांनी आज येथे दिला. ‘भारत देश २०४७ ला विश्वगुरू होईल’, असे सांगत त्यांनी हाच देश जगाचे भविष्य असेल, असे स्पष्ट केले.