शेतकरी आकर्षित व्हावा यासाठी राज्य शासनाने त्यासाठी योजनेनिहाय अनुदान जाहीर केले; पण प्रत्यक्षात त्याचे प्रस्ताव पाठवूनही हे अनुदान मिळालेले नाही.
कोल्हापूर : कृषी विभागाने (Agriculture Department) मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या अनेक योजनांमधील यावर्षीच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे. अनुदान वेळेवर मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःजवळचे पैसे घालून यात सहभाग नोंदवला; पण प्रत्यक्षात हेच शेतकरी (Farmer) आता हवालदिल झाले आहेत. यांत्रिकीकरण, ठिबक व ‘आत्मा’च्या विविध योजनांकडील यावर्षीचे अनुदानच थकले आहे.