Social Crisis : एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या घोषणा होत असताना, दुसरीकडे कोल्हापुरात आजही स्त्री-भ्रूणहत्या सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे. बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे जाळे राज्याच्या सीमाही ओलांडत असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.
कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण असे दोन आरोग्याशी संबंधित मंत्री कोल्हापुरातील असतानाही आजही स्त्री-भ्रूण हत्या होत आहेत. जिल्ह्यातील या अड्ड्यांचे जाळे बंगळूर, हैदराबादपर्यंत पोहोचले आहे.