Kolhapur Jaltirth : हजारो हात राबले, २६ टन कचऱ्याचा उठाव; ‘जलतीर्थ कोल्हापूर’, शहरवासीय, सामाजिक संस्थांसह महापालिकेचे ४५० कर्मचारी सहभागी
Cleanliness Drive : कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा सामूहिक शक्तीचे दर्शन घडवले. ‘जलतीर्थ कोल्हापूर’ स्वच्छता मोहिमेत हजारो हात दोन तास अविरत राबले आणि तब्बल २६ टन कचऱ्याचा उठाव करण्यात यश आले.
कोल्हापूर : ‘जलतीर्थ कोल्हापूर’ मोहिमेत विविध जलस्त्रोतांमधील, तसेच परिसरातील स्वच्छतेसाठी आज सकाळी दोन तास राबलेल्या हजारो हातांच्या माध्यमातून तब्बल २६ टन कचऱ्याचा उठाव झाला.