शाहू नाका : ‘छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना संधी मिळाली हे चांगले झाले. त्यांच्यासारख्या अनुभवी मंत्र्यांची या सरकारला गरज आहे. त्यामुळे त्यांना घेतले असेल. नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असून, तेथील पालकमंत्रिपदाबाबत लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे. आता भुजबळांसारखा ज्येष्ठ माणूस तेथे आल्यावर सरकारला त्यांनाच पालकमंत्री करावे लागेल, असा माझा अंदाज आहे,’ असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी येथे सांगितले.