
कोल्हापूर - गेल्यावर्षी जुलै, ऑगष्ट महिन्यात आलेल्या महापुराने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय तातडीने मार्गी लावा, असे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी यासंदर्भात मुंबईत बोलवलेल्या बैठकीत सहकार व अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
नव्याने कर्ज मिळण्यात अडचण
कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ९८ हजार पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी २९५ कोटी रूपयांची कर्जमाफी मंजूर झाली आहे. सांगली जिल्ह्यातही तेवढेच नुकसान झाले आहे. यासह सातारा जिल्ह्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
या निर्णयानंतर शासनाने महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेचेही पैसे अजून मिळालेले नाहीत. पूरग्रस्तांच्या कर्जमाफीची पैसे न मिळाल्याने अशा शेतकऱ्यांची कर्जे थकली आहेत, त्यामुळे नव्याने कर्ज मिळण्यात अडचण झाली आहे.
या पार्श्वभुमीवर मंत्री पाटील यांनी आज मुंबईत कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा
आढावा घेतला. बैठकीला विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर, कोल्हापुरचे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, सांगलीचे निळकंठ करे, कोल्हापू व सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.