

Kanchan Patil Spiritual Journey
esakal
कसबा तारळे : घरी कसलाही आध्यात्मिक वारसा नाही...संसारासाठी तीन गावांची भ्रमंती...जीवनाचा अर्धाअधिक काळ गरिबी, शिक्षण फक्त चौथीपर्यंत! ही गोष्ट आहे ७३ वर्षीय आजींची. सारा गाव त्यांना ‘वायरमन मामी’ म्हणून ओळखतो. या आजीबाईंनी उतारवयात आध्यात्मिक व आत्मिक समाधान म्हणून तीन ग्रंथांचे स्वहस्ताक्षरात लेखन पूर्ण केले आहे.