कोल्हापूर : विजेसाठी शेतकरी वेठीस

थकबाकी भरण्यासाठी महावितरणचा रेटा; पिके वाळू लागली
कोल्हापूर : विजेसाठी शेतकरी वेठीस
कोल्हापूर : विजेसाठी शेतकरी वेठीसsakal

माजगाव : जुलैमधील अतिवृष्टी व महापुरामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हबकून गेला आहे. महापुरात वीज खांब कोसळून कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित झाला. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असतानाच कृषी पंपाचे वीज बिल भरण्यासाठी महावितरणने शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

दीड वर्षे कोरोना महामारीमुळे कृषी मालाला भाव नाही. जुलैमध्ये अतिवृष्टी व महापुरातील नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यातून वाचलेल्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. दुसरीकडे महापुरात नदीकाठचे वीज खांब व डीपी पडल्यामुळे कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. पाण्याअभावी पिके वाळू लागल्याने महावितरणने कोसळलेले वीज खांब उभे करून ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

कोल्हापूर : विजेसाठी शेतकरी वेठीस
आधारस्तंभाची नवी इनिंग; द्रविड टीम इंडियाचा कोच

पण शेतकऱ्यांनी कृषी पंपाचे थकीत वीज बिल भरल्याशिवाय वीजपुरवठा केला जाणार नाही, अशी महावितरणची वाटचाल दिसते. एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना वीज बिलासाठी महावितरणने लावलेल्या तगाद्यामुळे शेतकरी हबकून गेला आहे.

'शेतकऱ्यांनी कृषी पंपाचे बिल भरलेच पाहिजे, अशी सक्ती नाही; परंतु डिसेंबरअखेर थकीत वीज बिल भरले, तर त्यांचे ५० टक्के बिल माफ होणार आहे. शेतकऱ्यांना वीज बिल सवलतीचा फायदा व्हावा, तसेच बिल वसूल व्हावे, यासाठी प्रयत्न केला जात आहे.'

- सरदार चौगले, शाखा अधिकारी, पडळ उपवीज केंद्र.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com