Kolhapur irrigation ban relaxation for farmers
esakal
कोल्हापूर : उन्हाच्या तडाख्याने शेती पिके वाळत आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, तेथे नद्यांवरील उपसाबंदी उठवावी, अशी आक्रमक मागणी राज्य इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने (irrigation ban relaxation) केली. त्यानंतर जलसंपदा विभागाकडून दूधगंगा वगळता नऊ नद्यांवरील उपसाबंदी तीन दिवस शिथिल करण्याचा निर्णय घेतला.