Radhanagari Dam latest water storage
esakal
कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून जिल्ह्यातील ४४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मात्र, आज (सोमवारी) सकाळी ७ वाजेच्या अहवालानुसार, राधानगरी धरणात ३.१५ टीएमसी पाणीसाठा असून धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या शून्य (निरंक) आहे.