धक्कादायक! कोल्हापुरातील कणेरी मठात 50 गायींचा मृत्यू

Kolhapur
Kolhapuresakal

कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील कणेरी मठ इथं 50 गायी दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गायींना अन्नातून विषबाधा झाल्याचं काही मराठी वृत्तवाहिन्यांनी म्हटलंय. मात्र, या वृत्ताबाबत अद्याप मठाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

कणेरीच्या सिद्धगिरी मठावर पंचमहाभूत सुमंगलम लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले होते.

कणेरी मठावरील गोशाळेतील बाराहून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त वाय. ए. पठाण यांनी दिली असली तरी अन्नातील विषबाधेतून मृत्यू झालेल्या गायींचा आकडा ५० हून अधिक असल्याची चर्चा आहे.

या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, हे प्रकरण दडपण्यासाठी मठावरील स्वयंसेवकांकडून माध्यम प्रतिनिधींवर धावून जाण्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, तीन गायींचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टम) पाठविण्यात आले आहेत. तसेच कोणी जाणीवपूर्वक गायींना मारण्याचा प्रयत्न केला आहे का, हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

दरम्यान, गोशाळेत बावीस प्रकारच्या गायींच्या प्रजाती आहेत. पुंगनूर, वेचूर, बरगूर, निमारी, उमलाचारी, राठी, थारपरकर, कांकरेज, खिलार, काजळी, खिलार ओंगळ, कृष्णावेल्ली, कोकणगिड्ड, हल्लीकार, लाल कंधारी, गीर, सहीवाल, जवारी, डांगी, अमृतामल, देवणी यांचा यात समावेश आहे. सुमारे नऊशेपैकी चारशे गायी, दोनशे नर, तर उर्वरित वासरं आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com