कोल्हापूर : जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींत आघाडी करताना वेगवेगळ्या पक्षांशी केली असली तरी निकालात महायुतीला अधिक जागा मिळाल्याने जिल्ह्याच्या भविष्यातील राजकारणात महायुतीला बळ मिळाले आहे.दुसरीकडे नगरपालिकेच्या राजकारणात एकेकाळी दबदबा असलेल्या काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची गरज असून, या निकालाने शिवसेना ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचेही स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षानेही हक्काच्या ठिकाणी सत्ता राखत आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला..स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारण हे पूर्वी काँग्रेस आणि त्या अंतर्गत असलेल्या गटाशी संबंधितच होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर या पक्षाचा त्यात समावेश झाला. निमशहरी तोंडावळा असलेल्या अशा नगरपालिकांत बरीच वर्षे काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या साथीने सत्ता स्थापन करत काँग्रेसने वर्चस्व ठेवले होते. .त्यावेळी अन्य पक्षांचा संबंधही नव्हता. यावेळची निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरली. त्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीही जवळजवळ बाजूला पडले आहेत. पेठवडगावमधील विद्या पोळ यांचा विजय हा त्यांच्या स्वतःच्या ताकदीचा आहे. .काँग्रेस नेतेही त्याचे श्रेय घेण्याचे धाडस करणार नाहीत. कुरुंदवाड, हातकणंगलेत काँग्रेसची होती ती सत्ताच गेली. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांचा इतका ऱ्हास का झाला, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे..निवडणूक झाली आणि त्यामध्ये पराभव झाला की काँग्रेस असो किंवा अन्य विरोधक इतर कारणे सांगून आरोप करत रहातात. त्यात ईव्हीएम हॅक, पैशांचा वापर यांसारखे आरोप केले जातात. पण, स्वतः काही आत्मपरीक्षण करत नाहीत. याउलट भाजप असो किंवा त्यांच्यासोबत राज्याच्या राजकारणात असलेली शिंदे सेना, राष्ट्रवादी अजित पवार हे पक्षाच्या यशासाठी काही करण्याच्या तयारीत दिसले. .त्यात निवडणूक यंत्रणा राबविणे, आर्थिक ताकद उभा करणे या पातळीवर काँग्रेस फारच मागे आहे. नगरपालिकांची निवडणूक असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे वरिष्ठ नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरले. या नेत्यांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार केला. चंदगडसारख्या छोट्या नगरपालिकेसाठी पण भाजप आमदारांच्या प्रतिष्ठेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभा घेतली. .दुसरीकडे काँग्रेसकडे आमदार सतेज पाटील यांच्याशिवाय दुसरा चेहरा प्रचारात दिसला नाही. राज्यपातळीवरील नेते तर फिरकलेच नाहीत. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व शिवसेना ठाकरे गटाच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी तर याकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांना मिळालेल्या जागांवरून दिसते. हा विरोधाभासही काँग्रेसच्या आणि एकूणच महाविकास आघाडीच्या पराभवाला कारणीभूत ठरला, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही..या निवडणुकीने निमशहरी अशी ओळख असलेल्या नगरपालिकांतील राजकारणही बदलल्याचे ही निवडणूक दाखवते. कागलमध्ये पक्षांपेक्षा गटातटाच्या राजकरणाला महत्त्व आहे. तिथे काळाची पावले ओळखून मंत्री हसन मुश्रीफ यांनी कट्टर विरोधक असलेल्या समरजितसिंह घाटगे यांच्याशी आघाडी केली. भाजपने या आघाडीला मान्यता देताना भाजपचे उमेदवारच उभे केले नाहीत..त्यातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा विजय सोपा झाला. अशा तडजोडी करण्याची गरज असताना त्याकडे विरोधकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसले. या निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या पक्षांसाठी ताकद पणाला लावली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जिल्ह्याच्या राजकारणाशी तसा फारसा संबंध नव्हता. .यावेळी पहिल्यांदाच ते राधानगरीच्या बाहेरील घडामोडीत सक्रिय झाले. त्यात पालकमंत्री म्हणून त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले. यातून जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुकीतही ते दबदबा ठेवण्याची शक्यता आहे. त्यातून जास्तीत जागा पक्षासाठी पदरात कशा पडतील, यासाठी त्यांचे प्रयत्न राहतील..या निवडणुकीत ‘जनसुराज्य’ने मांडलेली मुसंडी लक्षवेधी आहे. याउलट शिवसेना ठाकरे गट असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अस्तित्व दिसलेच नाही. ठाकरे गटाला अवघ्या नऊ, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला चारच जागा मिळाल्या. याउलट स्वतःच्या ताकदीवर ‘जनसुराज्य’ने दोन नगरपालिकांत नगराध्यक्ष पदासह सत्ताही मिळविली. या विजयाने ते महापालिका आणि जिल्हा परिषदेतही महायुतीत वर्चस्व मिळवू शकतात. .पुन्हा भिस्त काँग्रेस, सतेज पाटील यांच्यावर चमहाविकास आघाडीचा मात्र या निवडणुकीत पुरता धुव्वा उडाला आहे. महापालिकेसाठी आघाडी करायची की स्वतंत्र लढायचे, अशी द्विधास्थिती महाविकास’च्या नेत्यांची झाली आहे. त्यामुळे एकत्र लढायचे झाल्यास ठाकरे सेना व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची भिस्त ही पुन्हा एकदा काँग्रेस आणि आमदार सतेज पाटील यांच्यावरच राहणार आहे..महापालिकेत होणार रस्सीखेचनगरपालिका निवडणुकीतील यशामुळे महायुतीतील सर्वच घटक पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे. सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपकडून इथेही वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न राहील. त्याचवेळी शिंदे सेनेकडून या विजयाच्या जोरावर अधिकच्या जागांची मागणी होणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडेही महापालिका इच्छुकांची मोठी गर्दी आहे. अशा परिस्थितीत महायुतीतच जागा वाटपावरून मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.