

Kolhapur ZP Solar Projects
esakal
कोल्हापूर: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून वीज बचतीसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात असताना आता जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून तब्बल १३ कोटी रुपये सौरऊर्जा प्रकल्पांसाठी खर्च करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींना अशा प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध होत असताना जिल्हा परिषदेचा कोट्यवधींचा स्वनिधी यासाठी खर्च करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित होत आहे.