कोल्हापूर : गेले दोन ते तीन दिवस राधानगरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार असल्याने धरणाचे चार दरवाजे खुले झाले होतो. मात्र कालपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे सुरू असलेले दोन स्वयंचलित दरवाजे रात्री 12.30 वा. बंद झाले. फक्त विजगृहातून 1400 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात ५८ मिमी इतक्या पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर ३७२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा - यंदा देखावे अन् दर्शनही ऑनलाईन...!
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना स्थलांतर करण्याचे आवाहन केले होते. पावसाचा जोरामुळे धरणाचे चार दरवाजे खुले झाले होते. परिणामी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती.
नदीपरिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान कालपासून पावसाचा जोर कमी झाल्याने दोन दिवसांपूर्वी दोन दरवाजे बंद झाले होते. आणि उर्वरित दोन दरवाजे रात्री बंद झाले. यामुळे भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी होवून पूर ओसरण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.