आजरा : परिसरात दोन टस्करांनी धुमाकूळ घातला. शेतीचे मोठे नुकसान सुरू आहे. त्यांना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, यासाठी प्रयत्नशील असल्याचे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
हाळोली (ता. आजरा) येथील हत्तीकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. दरम्यान, शासनाने जमीन ताब्यात घेऊन आम्हाला आकाराप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
आमदार आबिटकर म्हणाले, ""नुकसानीचे पंचनामे वन विभाग करतो, भरपाई मिळते, हे रोजचे चित्र आहे. पण, याबाबत कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्याबाबत हा प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडणार आहे.'' या वेळी गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेले संभाजी मांगले, संभाजी कुंभार (रा. वेळवट्टी), निवृत्ती सुतार (रा. साळगाव) यांना प्रत्येकी सव्वा लाख असा तीन लाख 75 हजारांचा धनादेश तसेच येथील 20 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा एक लाख 28 हजारांच्या धनादेशाचे वाटप आमदार आबिटकर यांच्या हस्ते झाले.
आजऱ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. एस. के. लाड, अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, नगरसेवक संभाजी पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले, इंद्रजित देसाई, वनपाल सुरेश गुरव, वनरक्षक कृष्णा डेळेकर, तानाजी कवळीकट्टी, दशरथ अमृते, सरपंच अस्मिता कांबळे, उपसरपंच गोविंद केरकर उपस्थित होते.
संपादन - सचिन चराटी
kolhapur
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.