कोल्हापूर : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही मॉन्सूनपूर्व (Monsoon) पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होऊन राजाराम बंधारा (Rajaram Bandhara) पाण्याखाली गेला. त्यामुळे कसबा बावडा ते वडणगे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सुरक्षिततेच्या कारणास्तव या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आली. यंदा मेमध्येच राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे.