Rising Tourist Footfall at Rautwadi Waterfall
esakal
राधानगरी : अभयारण्य क्षेत्रातील राऊतवाडी धबधबा क्षेत्र सुधारणा आणि पायाभूत सुविधांमुळे सुरक्षित वर्षा पर्यटन स्थळ (Radhanagari monsoon tourism) बनले. पर्यटक आगमनात लक्षणीय वाढ झाली. मात्र, वाहन तळ सुविधा अद्याप बाकी राहिली आहे. यातून वाहतूक कोंडीची समस्या कायम राहिली आहे. शेजारच्या माळवर वन्यजीव विभाग, पोलीस यंत्रणा व स्थानिक समितीने वाहनतळ सुविधा निर्माण केली, तरच गर्दी व वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना होणार आहे.