विसाव्या शतकामध्ये भारतामधून चित्ता पूर्णपणे नाहीसा झाला. त्यानंतर चित्ताला बाहेर देशातून आणण्याची मागणी जोर धरू लागली. आता नामिबियामधून आठ चित्ते आज भारतात दाखल झाले. नामिबियामधून एका विशेष विमानानं आफ्रिकन आठ चित्त्यांचं भारतात आगमन झालं. हे आठ चित्ते मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात आले. पण तुम्हाला माहिती आहे का एक वेळ अशी होती की जेव्हा लोक चित्ते पाळायचे? तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे. पण हे खरंय. (Cheetah in India)
एक काळ असा होता की जेव्हा भारतामध्ये चित्ते पाळले जायचे. मुघल काळापासून राजे महाराजे चित्ते पाळायचे आणि एवढचं काय तर अनेकदा चित्त्यांकडून शिकार करुन घ्यायचे. कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज तसेच राजाराम महाराजांच्या काळात चित्ते पाळले जायचे. त्यावेळी अनेकदा चित्त्याद्वारे शिकार केली जायची.
चित्तेवान समुदाय
फार कमी लोकांना माहिती आहे की कोल्हापूरमध्ये चित्ते पाळणारा एक चित्तेवान समुदायच होता. इस्माईल चित्तेवान, धोंडी लिंबाजी पाटील हे या समुदयातील खुप नावाजलेली नावे होती. इस्माईल चित्तेवान हे चित्ते पकडायचे, सांभाळायचे, पाळायचे. त्यांना चित्तेपारधी असं म्हटलं जायचं. छत्रपती शाहू महाराज त्यांच्या या कलेने प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांना राजाश्रय दिला.
पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या चित्त्याला शांत करण्याचं काम चित्तेवान करायचे. चित्त्याच्या कंबरेला दोराचा कंडा बांधला की चित्ता शांत होत असे.शिकार करण्यासाठी घोडागाडीवर चित्ते उभे केले जायचे. त्यांनतर शिकार दिसताच चित्ते उड्या मारायचे. विशेष म्हणजे या चित्त्यांना गणप्या, स्टार, भवानीशंकर, लक्ष्मी असे नावे दिले जायची.
कोणतेही राजे महाराजे किंवा पाहूणे आले की चित्त्यांच्या खेळ रंगायचा. कोल्हापुरातला शेवटचा चित्ता 1960 साली मृत्यू पावला आणि कोल्हापूरातील चित्त्याचे अखेर अस्तित्व संपले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.