

Farmers Demand Railway : मिरज-पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणात २०१८ पासून बाधित शेतकऱ्यांचे भू-भाडे मिळावे, यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी बुधवार रात्रीपासून रेल्वे मार्ग रोखून धरला आहे. भू-भाडे देण्यासंदर्भात लेखी आश्वासनावर अडून बसलेल्या आंदोलकांनी गुरुवारीही आंदोलन कायम ठेवले. यामुळे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.