Kolhapur Cleaning Cmpaign : अवघ्या अडीच तासांत दोन टन कचरा हटवला; पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा झळाळून निघाला!
Rajaram Bandhara : कसबा बावड्यातील राजाराम बंधारा परिसर आज अक्षरशः झळाळून निघाला. पंचगंगा नदी घाटावर साचलेला दोन टन कचरा अवघ्या अडीच तासांत हटवण्यात आला.
कोल्हापूर : पंचगंगा नदीघाटावरचा कचरा गोळा करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला ते ज्येष्ठ नागरिक आज एकत्र आले आणि बघताबघता कचऱ्याने विद्रुप झालेला घाट स्वच्छ झाला.