Polluted Water in Panchganga River
Polluted Water in Panchganga Riveresakal

Panchganga River : पंचगंगा नदीत हजारो मृत माशांचा खच; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

पंचगंगा नदीत (Panchganga River) प्रदूषित पाणी आल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडले.
Summary

पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न शासन स्तरावरून निकाली काढण्याकरिता लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत नाहीत, हे उघड आहे.

शिरोळ : येथील पंचगंगा नदीत (Panchganga River) प्रदूषित पाणी आल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडले. यामुळे नदीपात्रात मृत माशांचा (Dead Fish) खच पडला आहे. मासे मृत्युमुखी पडल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून, याकडे प्रदूषण महामंडळाने (Pollution Corporation) जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याने, जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Polluted Water in Panchganga River
पंचगंगा नदीत प्रदूषण वाढले; दररोज 42 दशलक्ष लिटर मैला, रक्तमिश्रित दुर्गंधीयुक्त सांडपाणी मिसळतंय पंचगंगेत

शिरोळ येथील बंधाऱ्याजवळ गेल्या काही दिवसांपासून जलपर्णीचा विळखा पडला होता. जलपर्णी काढण्याकरिता प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान, सोमवारी (ता. १३) व मंगळवारी (१४) पंचगंगा नदीत दुर्गंधीयुक्त व रसायनयुक्त प्रदूषित पाणी मिसळल्यामुळे, मंगळवारपासून नदीपात्रातील मासे ऑक्सिजनअभावी गुदमरून मरत असल्याचे मच्छीमारांच्या लक्षात आले.

यामुळे मच्छीमारांनी विनाजाळी मासे पकडण्यास सुरुवात केली. अनेकजण पोती भरून मासे नेत होते. शिवाय अनेक मृत मासे जलपर्णीतून प्रवाहाबरोबर बंधाऱ्याजवळ आले. यामुळे बंधारा परिसरात मृत माशांचा खच पडलेला आहे. दूषित काळे पाणी व मृत माशांमुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. रासायनयुक्त दूषित पाण्याबरोबर अनेक गावांतील सांडपाणी व मैलामिश्रित पाणी नदीपात्रात मिसळत आहे. हे पाणी विषारी बनले असून, पिण्यास अयोग्यच बनले आहे. जलचरांबरोबर मानवी आरोग्यासही ते पाणी अयोग्य बनले असताना, प्रदूषण महामंडळाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

Polluted Water in Panchganga River
Kalammawadi Dam : काळम्मावाडी धरणाला धोकादायक गळती; अजितदादांच्या 'त्या' आदेशाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न शासन स्तरावरून निकाली काढण्याकरिता लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत नाहीत, हे उघड आहे. प्रत्येक वर्षी लाखो मासे मृत्युमुखी पडून, तसेच दूषित पाण्यामुळे नागरिकांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे, यामुळे हे पाणी पिऊन माणसे मेल्यानंतरच प्रदूषण महामंडळ कारवाई करणार का?

-रामदास गावडे, शिरोळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com