पर्यावरणाच्या हानीला मानवाने केलेली वृक्षतोडच कारणीभूत : अनिता घाटगे

पर्यावरणाच्या हानीला मानवाने केलेली वृक्षतोडच कारणीभूत : अनिता घाटगे

तनिष्का लोगो लावा
00746
गोकुळ शिरगावला रोपांचे वाटप
गोकुळ शिरगांव : औद्योगिकरणाच्या नावाखाली प्रचंड वृक्षतोड हीच पर्यावरणाच्या हानीचे कारण आहे. यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे, असे मत अनिता घाटगे यांनी व्यक्त केले. येथे ‘सकाळ’च्या तनिष्का व्यासपीठातर्फे पर्यावरण दिनानिमित्त आयोजित पर्यावरण जनजागृतीवेळी प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. यावेळी तनिष्का व्यासपीठामार्फत महिलांना देशी वृक्षांचे महत्त्व सांगून तीस देशी झाडांचे वाटप झाले. केडीसी बँक शाखाधिकारी उत्तम खोत व एस. आर. मगदूम यांनी बँकेमार्फत महिलांसाठीच्या योजनांची माहिती दिली. जागतिक गिर्यारोहक अन्वी घाटगे हिचा देशी झाडाचे रोप देऊन सत्कार झाला. यावेळी मुलांकडून पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व सांगणारे नाटक झाले. कार्यक्रमास सिद्धनेर्ली विद्यालयाचे कलाशिक्षक अवधूत पोतदार, चेतन घाटगे, तनिष्का सदस्या संगीता गवळी, उपसरपंच रूपाली म्हाकवे, समन्वयक सचिन चौगलेंसह सदस्य व महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन उर्मिला पाटील, प्रास्ताविक प्रियांका पाटील व गटप्रमुख नीलम जाधव यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com