कोथिंबीरची पेंढी ४० रुपयांना

कोथिंबीरची पेंढी ४० रुपयांना

08692
इचलकरंजी : १) भाजीपाला बाजारात आंबाडा भाजीची आवक चांगली आहे.
08691
२) लोणच्याच्या आंब्यांना मागणी वाढली आहे.
-------
कोथिंबिरीची पेंढी ४० रुपयांना
इचलकरंजीत आंबाडा भाजीची आवक ः लोणच्याच्या आंब्यांना मागणी
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १६ : कडक उन्हामुळे दरही कडक झालेल्या भाजीपाला बाजारात मागणी कमी झाली आहे. मे महिन्याच्या मध्यानंतर मुहूर्त नसल्याने समारंभांना ब्रेक लागला. त्यामुळे मागणीत मोठी घट झाली आहे. परिणामी आता फळभाज्यांचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पालेभाज्यांचे भाव कडकच आहेत. कोथिंबीर पेंढीचा दर ४० रुपयांवर पोहोचला असून, मेथीही वाढूनच आहे. हंगामी आंबाडा भाजीची आवक आणि मागणीही चांगली आहे.
बाजार समितीत कांद्याच्या आवकेत काहीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे काही दिवसांत दर वाढण्याची चिन्हे आहेत. लोणच्याच्या आंब्यांना मागणी वाढली आहे. शहरातील बाजारासह ठिकठिकाणी हे आंबे विक्रीस आहेत. आठवडी बाजारात लोणच्याच्या आंब्यांची जाग्यावरच फोडून विक्री होत आहे. फूलबाजारात मागणी नसल्याने दर चांगलेच पडले आहेत. निशिगंधसह अन्य फुलांच्या दरात दुप्पट ते तिप्पट वाढ झाली आहे. खाद्यतेल बाजारात उतरण सुरूच आहे.

प्रतिकिलो रुपये भाजीपाला ः टोमॅटो- २० ते ३०, दोडका- ५० ते ६०, वांगी - ८० ते १००, कारली- ५० ते ६०, ढोबळी मिरची- ८० ते १००, मिरची -८० ते ९०, फ्लॉवर - ३० ते ४०, कोबी- २० ते २५, बटाटा- ३० ते ३५, कांदा - २५ ते ३०, लसूण- २०० ते २४०, आले- १०० ते १२०, लिंबू - २०० ते ६०० शेकडा, गाजर - ५० ते ६०, बीन्स- २५० ते ३००, गवार -८० ते १००, वरणा शेंगा - ६० ते ८०, भेंडी- ५० ते ६०, काकडी- ५० ते ६०, दुधी - २० ते ३०, हिरवा वाटाणा - ७० ते ८०, पालेभाज्या - २०, कोथिंबीर, मेथी - ३० ते ३५, शेवगा - २ ते ३ रुपये नग.
- - --- - - -
फुले : झेंडू - ८० ते १००, निशिगंध - १५० ते २००, गुलाब - २०० ते ३००, गलांडा - १०० ते १२०, शेवंती - १५० ते १८०.
- - -- - -
फळे : सफरचंद - २५० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १२० ते २००, चिकू- १०० ते १२०, पेरू- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ४० ते ५०, मोरआवळा -१०० ते १२०, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ७० ते ८० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच-१०० ते १४०, अननस -४० ते ५०, अंजीर -८०-१००.
-- -
खाद्यतेल : सरकी - १०८ ते ११२, शेंगतेल - १७४ ते १८०, सोयाबीन - १०८ ते ११२, पामतेल - १०८ ते ११४, सूर्यफूल - १०८ ते ११२.
-------
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३१ ते ३७, बार्शी शाळू- ३२ ते ५५, गहू - ३२ ते ४०, हरभराडाळ - ७८ ते ८३, तूरडाळ- १५५ ते १६५, मूगडाळ - ११० ते ११५, मसूरडाळ - ७८ ते ८२, उडीदडाळ - १२२ ते १३०, हरभरा- ७०, मूग- १०० ते ११०, मटकी- १०० ते ११०, मसूर- ७०, फुटाणाडाळ - ८३ ते ८५, चवळी- ८८, हिरवा वाटाणा- ९०, छोले -१४० ते १६०.
--------
वरणा, घेवडा नाहीच
वरणा, घेवडा या फळभाज्यांची नेहमी उन्हाळ्यातही कायम तेजीत आवक असायची. यंदा मात्र दोन्ही भाज्या बाजारात शोधून सापडेना झाल्या आहेत. पाणी नसल्याने या भाज्यांचे उत्पादन न घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com