थंड पाण्याचे जार भागवताहेत तहान

थंड पाण्याचे जार भागवताहेत तहान

97779
थंड पाण्याचे जार भागवताहेत तहान
व्यावसायिकांची सुगी; वाढत्या उष्म्याने मागणी वाढली
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. १४ : वाढत्या उष्म्यामुळे लग्नसराईसह सर्वच कार्यक्रमांमध्ये थंड व स्वच्छ पाण्याला मागणी वाढली आहे. लग्न समारंभामध्ये पाण्याच्या जारना मागणी वाढली आहे.
खेड्यापासून शहरापर्यंत पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. जारमध्ये मिळत असलेल्या पाण्याला नागरिक पसंती देत आहेत. लग्नसराईत थंड पाण्याच्या कॅनला मोठी मागणी आहे. हेच थंड पाण्याचे कॅन वऱ्हाडी मंडळींची तहान भागवत आहे. लग्नात वऱ्‍हाडींकडून भोजनानंतर थंड पाण्याची मागणी केली जात असल्याने त्यांची तहान भागवण्यासाठी जारच्या पाण्याला अधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही आता मोठ्या प्रमाणात जारमधील पाण्याची मागणी वाढली आहे. जारमधून पाण्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आता सुगीचे दिवस आले आहेत. पूर्वी लग्न आणि इतर समारंभासाठी टँकरद्वारे पाणी आणले जात होते; मात्र लग्न समारंभातच नव्हे, तर लहान-मोठ्या कार्यक्रमांतही थंड जारच्या पाण्याची मागणी वाढली आहे.
लग्न समारंभात थंड पाण्याची मागणी केली जात असल्याने तहान भागवण्यासाठी पाण्याच्या कॅनचा वापर करण्यात येत आहे. तीस रुपयांत घरपोच मिळणारा कॅन अविभाज्य भाग झाला आहे. आजकाल ग्रामीण भागातही पाणी कॅन व्यवसाय व प्लांट सुरू झाले आहेत. त्यामुळे लग्न कार्यात थंड पाणी मिळत आहे.
....
प्लास्टिक ग्लास प्रदूषणाला कारणीभूत
हल्ली पाण्याच्या कॅनसोबतच पाणी पिण्यासाठी सर्रासपणे प्लास्टिकचे डिस्पोजेबल ग्लास वापरले जात आहेत. एकदाच वापरण्यायोग्य या ग्लासांचा खच मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्लास्टिकचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com