गड-राजू शेट्टी प्रतिक्रिया

गड-राजू शेट्टी प्रतिक्रिया

Published on

राजकीय नेत्यांनी लायकी
तपासावी : राजू शेट्टी

गडहिंग्लज, ता. ३ : निवडणूक आयोगाने मतदान करताना आता शाईऐवजी चुना लावावा असे लोक म्हणत आहेत. ही सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे. यावरून राजकीय नेत्यांनी अंतर्मूख व्हावे. आपली काय लायकी आहे हे तपासून बघावे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर व्यक्त केले. गडहिंग्लज दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘‘जातीय-धार्मिक मुद्द्यावर मते मागायची नाहीत, शेतकऱ्यांसाठी चांगली धोरणे राबवायची, विकासाचे आणि भ्रष्टाचारविरोधी मॉडेल राबवायचे, या मुद्द्यावर आम्ही काही काळ भाजपसोबत होतो. पण, त्यांनी या मुद्द्यांना बगल दिली. गुजरातचे विकासाचे मॉडेल म्हणजे आभासी प्रतिमा असल्याचे लक्षात आले. भूमी अधिग्रहण कायद्यात दुरुस्ती केली. त्यामुळे पुन्हा त्यांची संगत करावी असा विचार नाही. महाविकास आघाडीसोबतही दोन वर्षे होतो. पण, तेही भाजपसारखेच निघाले. एफआरपीचे तुकडे पाडले. भूमी अधिग्रहणची भरपाई चौपटवरुन दुप्पट केली. म्हणून त्यांचे संबंध तोडले. लग्न झाले तरी संन्यास घेता येतो. तसा आता संन्यास घेतला आहे. कोणाबरोबर आघाडी करायचे मनात नाही.’’ स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.