तपास असा..असे चौक

तपास असा..असे चौक

87603
...
अखेर मोटारचालक म्हणून
चव्हाणांवर गुन्हा दाखल

जखमी झाला फिर्यादीः गुन्हा नोंदविताना पोलिसांची झाली कसरत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः सायबर चौकात भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने तिघांचा जीव घेतला, मात्र चालकही ठार झाल्यामुळे फिर्याद कोण देणार, कोणावर गुन्हा दाखल करणार अशी स्थिती झाली होती. अखेर पोलिसांनी हॉकी स्टेडियम येथील खासगी रुग्‍णालयात उपचार घेत असलेल्या जखमीची फिर्याद घेतली आणि चालक व्ही. एम.चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला. राजारामपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली.

अपघातात जखमी होऊन मृत्यू झालेल्या कलमांनुसार पोलिसांनी रात्री उशिरा चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदनासाठी पुढील प्रक्रिया केली जात नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे अपघातात जखमी झालेल्‍या व्यक्तीची फिर्याद घ्यावी लागते. सुरुवातीला पोलिसांनी राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात जखमी असलेल्यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. रात्री त्या जखमीचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांना पर्यायी जखमीकडे विचारपूस करून त्यांचा जबाब घेतला. यामध्ये अपघात झाल्यामुळेच जखमी झाल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, मोटारचालकच ठार झाल्यामुळे मृत्यूला जबाबदार म्हणून कोणाकडे बोट दाखवायचे हा एक प्रश्‍न स्थानिकांना पडला आहे; मात्र मोटारचालक ठार झाला असला तरीही फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार त्याचावर गुन्हा दाखल होऊ शकतो म्हणून चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे राजारामपुरी पोलिसांनी सांगितले.
...
चौक आणि प्रवेशद्वार चर्चेत
शहरातील बहुतांश महाविद्यालयांचे प्रवेशद्वार थेट मुख्य रस्त्याला आणि चौकात असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक वेळा तेथून उलट्या दिशेने मुख्य मार्गावर प्रवेश करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसते. सायबर चौकातसुद्धा प्रवेशद्वारापासून उलट दिशेने येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे असे चौक धोकादायक बनले आहेत.
...
प्रवेशद्वार उपरस्त्याला असावे
शक्यतो मुख्य रस्त्याला प्रवेशद्वार असल्यामुळे तेथून थेट प्रमुख रस्त्यावर आल्यामुळे अपघात होऊ शकतात. अशा शाळा, महाविद्यालयांचे प्रवेशद्वार शक्यतो उपरस्त्याला असावे. किंबहुना त्यांनी उलट दिशेने चौकात येऊ नये, अशी व्यवस्था केली तर अपघाताला मिळणारे आमंत्रण रोखता येईल.
...
सिग्नल सुरू असता तर...
आज सिग्नल सुरू असता तर किमान ही मोटार इतक्या भरधाव वेगाने चौकात आली नसती. चौघे ठार झाले नसते, अशाही प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्या आहेत. सिग्नलवर नियम न पाळणे, दुचाकीवरून तिब्बलसीट जाणे असे अनेक प्रकार शहरात घडत आहेत. शहरातील ५० टक्के सिग्नल कायमस्वरूपी बंद असतात. त्यामुळेही धोका वाढला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com