योग्य नेतृत्वामुले समाजात सकारात्मक बदल

योग्य नेतृत्वामुले समाजात सकारात्मक बदल

02049
निट्टूर : येथील कार्यक्रमात भास्कर पेरे-पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच गुलाब पाटील, घनशाम पाटील, आदी उपस्थित होते.


योग्य नेतृत्वामुळे समाजात सकारात्मक बदल
भास्कर पेरे-पाटील; निट्टूरला सेवाभावी संस्था व ग्रामपंचायततर्फे व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. ११ : देश महासत्ता करण्यासाठी सर्वप्रथम ग्रामीण भागात सुधारणा होणे आवश्यक आहे. शंभर वर्षांचे आरोग्य मिळण्यासाठी गावात स्वच्छ हवा, पाणी आणि चांगले अन्न मिळाले पाहिजे. योग्य नेतृत्व मिळाले, तर समाजात सकारात्मक बदल घडतो, असे मत भास्करराव पेरे-पाटील (पाटोदा) यांनी व्यक्त केले.
निट्टूर (ता. चंदगड) येथील आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व ग्रामपंचायत तर्फे आयोजित केलेल्या व्याख्यानात ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पेरे-पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच गुलाब पाटील होते. एस. जे. पाटील यांच्या हस्ते पेरे-पाटील यांचा सत्कार करण्यात आला. घनशाम पाटील यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी पेरे-पाटील म्हणाले, ‘१९९५ पासून पाटोदा या चार हजार वस्तीच्या गावात काम सुरू केले. माझे शिक्षण सातवीपर्यंत आणि घरी वारकरी वातावरण होते. लोक आरोग्यपूर्ण आणि दीर्घायुष्य जगले पाहिजेत म्हणून काम केले. पूर्वजांना नावे ठेवू नका, त्यांच्या काळात ते योग्य होते. आपणच मोडतोड करून समस्या वाढविल्या आहेत. मतदानासाठी जातीत भांडण लावणे थांबवा. गावच्या कारभारात महिलांचा सहभाग वाढवा. लोकसहभागाला प्राधान्य द्या. प्रथम कुटुंब, नंतर गाव आणि यातून देश सुधारला की, देश महासत्ता होईल. आज सर्वच प्रकारांत भेसळ वाढली आहे. याकडे समाजातील कर्त्या माणसांनी लक्ष दिले पाहिजे. समाज ऐकतो, असा माझा अनुभव आहे. सांगणारा योग्य दर्जाचा आणि प्रामाणिक पाहिजे. पाटोदा आदर्श करण्यासाठी मी काही जादूची कांडी वापरली नाही. ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांच्या खूप कमी अपेक्षा असतात. मूलभूत सुविधांची वेळेत पूर्तता केली की लोक समाधानी राहतात. त्याशिवाय खूप करण्यासारखे असते. तशी दृष्टी ठेवून आपण वाटचाल केली, तर महाराष्ट्रातील सर्वच गावे ‘पाटोदा’ होण्यास वेळ लागणार नाही.’’ वाय . व्ही . कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. गुलाब पाटील यांनी आभार मानले.
-------------
चौकट
...तर वृद्धाश्रम बंद होतील
गावकऱ्यांनी गावातील वृद्धांना सांभाळल्यास वृद्धाश्रम बंद होतील, असा दावा करत पेरे-पाटील यांनी ज्या गावात राजकीय पुढारी जास्त त्या गावाचा कधीच विकास होणार नसल्याचे सांगत गावाच्या पर्यायांनी स्वतःच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com