Tilari Ghat
Tilari Ghatesakal

Tilari Ghat : कोकणासह घाटमाथ्याला जोडणाऱ्या तिलारी घाटातील वाहतूक 'इतके' दिवस राहणार बंद, काय आहे कारण?

Tilari Ghat : अपघातप्रवण जागेवर गॅबियन भिंत (Gabion Wall) उभारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. तेवढा काळ घाटातील वाहतूक बंद राहणार आहे.
Published on
Summary

गेल्या वर्षभरात घाटातील एका वळणावर सातत्याने अपघात झाले. त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंटची भिंत उभारली होती. मात्र, अपघातांमुळे ती कोलमडली आहे.

चंदगड : कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या तिलारी घाटाच्या (Tilari Ghat) दुरुस्तीला अखेर बांधकाम विभागाला (Construction Department) मुहूर्त मिळाला आहे. घाटातील एका वळणावर अपघातप्रवण क्षेत्र असून, तिथली दुरुस्ती गरजेची असल्याच्या मुद्यावर एसटी महामंडळाचा वाहतूक विभाग ठाम राहिल्याने बांधकाम विभागाने आजपासून कामाला सुरुवात केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com