राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : गेल्या दोन दिवसात राधानगरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाने जोर धरल्याने धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. आज पहाटे राधानगरीच्या सात स्वयंचलित दरवाजे पैकी दोन दरवाजे पुन्हा खुले झाले आहेत. यातून 2856 व वीज निर्मितीसाठी चौदाशे असा 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या भोगावती नदी पात्रात सुरू असल्याने या नदीचे पाणी पात्राबाहेर जाण्याची शक्यता आहे.
काल पासून या तालुक्यात पावसाने चांगलाच जोर धरला. काल सकाळच्या 24 तासात दाजीपूर येथे तब्बल 74 मिलिमीटर पाऊस नोंदला. यामुळे अभयारण्य क्षेत्रातील पाणी मोठ्या प्रमाणात राधानगरीच्या 'लक्ष्मी' तलावात आले. परिणामी पाणीपातळी झपाट्याने वाढली. पाण्याची आवक लक्षात घेता काल राधानगरी धरणाच्या पायथ्याला असलेल्या वीज निर्मिती गृहात साठी 1400 पाण्याचा विसर्ग सुरू केला.
मात्र आवक मोठी असल्याने आज पहाटे धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. क्रमांक तीन आणि सहा हे दरवाजे खुले झाले असून यातून प्रत्येकी 1428 प्रमाणे 2856 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे व वीज निर्मितीसाठी चे असे मिळून 4 हजार 256 क्यूसेक विसर्ग सध्या भोगावती नदी पात्रात सुरू असल्याने अचानक पाणी वाढणार आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान काळम्मावाडी धरण क्षेत्रात पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढल्याने या धरणाच्या कमाल पाणीपातळी पेक्षाही अधिक पाणीसाठा झाल्याने त्याचे 5 वक्राकार दरवाजे काल रात्री 25 सेंटिमीटरने उघडण्यात आले. यातून व वीज निर्मितीसाठी असे पाच हजार क्युसेक पाणी दूधगंगा नदीत सोडल्याने या नदीलाही पूर स्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळपासून ही पावसाची रिपरिप सुरूच आहे.
संपादन - अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.