

encroachment issues
sakal
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर हा कोल्हापूरच्या अस्मितेचा आणि अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. मात्र, काही वर्षांत वाढलेली भाविकांची संख्या आणि त्या तुलनेत अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे या परिसराचा विकास एका पेचात अडकला आहे. मंदिर परिसरातील ‘मार्केट’ला जागतिक दर्जाचे स्वरूप द्यायचे असेल, तर केवळ इमारतींचे सुशोभीकरण करून चालणार नाही, तर वाहतूक कोंडी, पार्किंग आणि विस्कळीत नियोजन यासारख्या मूळ समस्यांवर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.