Vaibhavwadi Kolhapur Railway
esakal
रत्नागिरी : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणारा तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या विकासाचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या ‘वैभववाडी -कोल्हापूर’ या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रस्तावित रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी पुण्यातील बैठकीत (Vaibhavwadi Kolhapur railway fresh survey) सांगितले. त्यामुळे अनेक वर्षे फक्त चर्चेत असलेल्या या मार्गाला चालना मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. हा मार्ग अस्तित्वात आला तर त्याचा रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापार, उद्योगासह पर्यटनाला फायदा होईल, असा विश्वास विलास पाटणे यांनी व्यक्त केला.