शिवछत्रपतींनी पुनर्बांधणी करून घेतलेल्या किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामाला लवकरच प्रारंभ: संभाजीराजे छत्रपती

vijaydurg Enhancement started now post on facebook from MP Sambhaji Raje Chhatrapati
vijaydurg Enhancement started now post on facebook from MP Sambhaji Raje Chhatrapati

कोल्हापूर : शिवछत्रपतींनी पुनर्बांधणी करून घेतलेला व मराठा आरमाराच्या प्रमुख शक्तीकेंद्रापैकी एक असलेल्या किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती आज  खासदार संभाजीराजे छत्रपती  यांनी  सोशल मीडियावरून दिली आहे.

त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी समुद्राच्या लाटांनी झिजवली आणि बुरुजचा भाग ढासळत असल्याचे निदर्शनास आले होते. स्वराज्यातील आरमाराचे प्रमुख शक्तीकेंद्र असलेला महत्वाचा जलदुर्ग काळाच्या ओघात विदीर्ण अवस्थेत पोचला असल्याचे काही शिवभक्तांनी लक्षात आणून दिले होते. अॉगस्ट महिन्यात विजयदुर्गला भेट देऊन पाहणी सुध्दा केली होती. केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांना भेटून गडाच्या सद्यपरिस्थितीची माहिती देऊन, लवकरच तटबंदीचे व बुरुजाचे काम सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली होती.

आज मुंबई पुरातत्त्व कार्यालयाकडून  पत्र प्राप्त झाले असून लवकरच गडावर संवर्धनाचे काम सुरु करण्यात येणार आहे व त्यासाठी दिल्लीतील पुरातत्व सर्वेक्षण कार्यालयाकडून सुध्दा मान्यता मिळाली आहे. सर्व शिवभक्तांच्यावतीने केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्याचे विशेष आभार."

संपादन- अर्चना बनगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com