आंबा : कुर्बानीविना पार पडलेल्या बकरी ईदनंतर (Bakari Eid) दुसऱ्या दिवशी विशाळगडावर पर्यटक (Vishalgad Tourist) व भाविकांनी गर्दी केली होती. प्रशासनाने उरुसास बंदी घालूनही महाराष्ट्रासह कर्नाटकातील सुमारे तीन हजारांहून अधिक भाविकांनी गडावर हजेरी लावली होती. न्यायालयाच्या अटी व शर्तींशी अधीन राहून दर्ग्यात नमाज पठण पार पडले. तुरबतीवर फुलांच्या चादरी अर्पण करण्यात आल्या.