रस्त्याअभावी वेळेत उपचार न झाल्याने धनगरवाड्यातील महिलेचा दुर्दैवी मृत्यू; भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी..

Bhendai Dhangarwada in Karvir : स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी आजही शहरापासून वीस-पंचवीस किलोमीटरवरील धनगर वाड्यावर रस्ते नसल्याने नागरिकांना जीवाला मुकावे लागत आहे.
Kolhapur News
Kolhapur Newsesakal
Updated on

कुडित्रे : करवीर तालुक्यातील बेंडाई धनगरवाडा (Bhendai Dhangarwada in Karvir) येथे रस्त्याअभावी रुग्ण महिलेला रुग्णालयात (Hospital) आणण्यास खूप उशीर झाला. वेळेत उपचार मिळाले नसल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दगडूबाई राजाराम देवणे (वय ५५) असे त्यांचे नाव आहे. रस्त्याअभावी आणखी किती महिला रुग्ण व नागरिकांचा मृत्यू होणार, असा संतप्त सवाल धनगरवाड्यातील लोकांना विचारला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com