मदत करणाऱ्यां सरपंचावरच केला हल्ला : परप्रांतीय कामगारांनी माजवली दहशत

khotwadi
khotwadi

तारदाळ (इचलकरंजी) :  परप्रांतीय मजुरांना दररोज त्यांच्या गावाकडे सोडण्याचे नियोजन होत असतानाच इचलकरंजी लगत असलेल्या खोतवाडी येथील सरपंचावरच पाचशे कामगारांनी हल्ला करण्याचा प्रयत्न  झाला. यामुळे या परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण केला. 


   परप्रांतीय कामगारांनी मोठी दहशत याठिकाणी माजवली.  घटनास्थळी इचलकरंजीतील शहापूर  पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश निकम  जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे आणि पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी हल्ला करीत दहशत मोडून काढले. परिसरात  दोन तास पोलिसांचा फौजफाटा हजर होता.गेली चार दिवस ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खोतवाडी आणि परिसरामध्ये असणारे परप्रांतीय कामगारांना दररोज तीनशे ते चारशे कामगारांना त्यांच्या गावाकडे सोडण्यासाठी पाच ते सहा गाड्यांचे नियोजन केले आहे .

 इचलकरंजी लगत खोतवाडीतील घटना

दररोज कामगार जात आहेत.  परंतु सोमवारी सकाळी  दहा वाजता परप्रांतीय कामगार एकत्र येऊन सरपंचांवर रागाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे या परिसरात गोंधळ माजला. यावेळी काही गावातील नागरिकांनाही धक्काबुक्की झाली.  कामगारांसाठी सरपंच संजय चोपडे गेली पंधरा दिवस खोतवाडी आणि परिसरातील कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या चार दिवसात पंधराशे वर कामगार त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहेत असे असताना  कामगारांनी सरपंच संजय चोपडे यांच्याबरोबर वादावादी केली केली व हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाचशेवर असणाऱ्या या परप्रांतीय कामगारांनी या परिसरात काही काळ दहशत माजवली होती.

गावच्या सरपंच वरच केला परप्रांतीय कामगारांनी हल्ला

दरम्यान पोलिस निरीक्षक प्रकाश निकम आणि यांचा फौजफाटा हजर होताच दहशत करणारे कामगार पळून गेले. तसेच यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे ग्रामपंचायत सदस्य गजानन नलगे अनिल माने यांच्यासह सदस्यांनी जमाव पागवून  कामगारांना शांत करण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला. दरम्यान घटनास्थळी डीवायएसपी गणेश बिरादर यांनी घटनास्थळी भेट देऊन मारामारी करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले.  कामगारांना ताब्यात घेतले आहे.कामगारांनी सरपंचांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने संबंधित  दहशत माजविणाऱ्या कामगारांच्या वर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


परप्रांतीय कामगार साठी आम्ही गेले आठ दिवस ग्रामपंचायत सदस्य प्रशासकीय अधिकारी तलाठी व लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून गेली आठ दिवस सर्व कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी प्रयत्न करत आहोत.  आठ दिवस कामगारांच्या भोजनाची सोय ग्रामस्थांनी केली आहे. पंधराशे कामगार आम्ही गावातून सोडले आहेत. असे असताना बिहारच्या परप्रांतीय कामगारांनी अति ताई पणा करून करून माझ्या वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
 संजय चोपडे, खोतवाडी सरपंच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com