
कुरुंदवाड : कोल्हापूर, सांगलीमध्ये सतत येणाऱ्या महापुराला आलमट्टी धरण व हिप्परगी बंधाराच कारणीभूत आहे. त्यामुळे ‘आलमट्टी’च्या उंचीवाढीला विरोध असून राज्य सरकारने उंची वाढीला सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर विरोध करावा. जागतिक बँकेकडून मिळालेल्या ३२०० कोटींतून नदीपात्रातील भराव, पूल अडथळे काढण्याची कामे प्राधान्याने करावीत यांसह विविध ठराव आज येथे झालेल्या पूर परिषदेत करण्यात आले.