Maharashtra Farm Loan Waiver Scheme 2026
esakal
सांगली : राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ऐतिहासिक (Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver) आहे. ५० हजार रुपयांचा लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली असून, शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच ४८ हजार कोटींची कृषी वीज बिले माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे, अशी माहिती आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.