सांगली : जिल्ह्यातील ४६ हजार ग्राहकांकडे १५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. वेळेवर वीजबिल न भरणाऱ्यांचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात येत आहे. थकबाकीदार वीजग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा. वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.